विचारांचे वादळ
आज २० ऑगस्ट २०२५. गीता जाऊन ११ दिवस झाले. तिच्या जाण्याची खंत मनाला सतत सलत आहे. वाटलं होतं, ३-४ दिवसांचा राग-फुगवा जाईल आणि परत सगळं व्यवस्थित होईल. पण तसं लवकर होईल असं दिसत नाही. आज ती टाकळीला गेली. मागचे १० दिवस ती मीराकडे थांबली होती. इतके दिवस का थांबली बरं? ती नात्याबद्दल आशावादी होती का? की डुग्गुचा १८ तारखेला वाढदिवस होता आणि दोन दिवस सतत पाऊस पडत होता म्हणून तिने आज जायचा निर्णय घेतला? हे फक्त तिलाच माहीत. मला माहित आहे रागाच्या भरात मी इतके बोलायला नको होते, हे सगळं पैशावरून झालंय. त्या पैशाचा माज नक्की नाही मला. असता तर मी ५ वर्ष पैसे पैसे करत असतो. जे झालं त्याबद्दल मी माफी पण मागेल. फक्त गीताने पण शांत डोक्याने या पुढे विषय वाढणार नाही यासाठी मनापासून प्रयत्न करावे. मला आता तिने इथे यावंसं वाटतंय, पण तिलाही इथली थोडी तरी ओढ असावी. वाद झाले तर कधी तिने, कधी मी शांतपणे त्यातून मार्ग काढायला हवा. तिने कधीही टाकळीला पळ काढू नये. इशू असेल, तर वाद विसरून पुढे जावं. एकमेकांबद्दल मनातून नेहमी आदराची भावना असावी. मला काही ताण असेल तर तिने शांतपणे ऐकावं, आणि तिच्या मनात...